• २३ फेब्रुवारी, २०२४ पासून योजनेच्या अंमलबजावणीस सुरूवात.
• २० ते २५ लक्ष बंजारा/लमाण समाजास मुख्य प्रवाहात आणुन विकासाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट.
• पिढ्यान्पिढ्या गावापासुन दूर असलेला बंजारा / लमाण समाजाचा तांडा विकासापासुन वंचित असल्यामुळे त्यांचे रहाणीमान उंचावणे, उत्पन्नाचे स्त्रोत वाढवणे, आर्थिकदृष्ट्या स्वयंपुर्ण बनवण्यावर भर.
• बंजारा/लमाण तांडा वस्ती, गावठाण, महसूली गावाचा दर्जा देऊन ग्रामपंचायत स्थापन करणे.
• तांड्यापासुन २ कि.मी. परिसरातील ३५० लोकसंख्या असलेल्या वसाहतींनासुध्दा पुनर्वसित गावाप्रमाणे तांड्यांचा/महसूली गावाचा दर्जा देणे.
• सामुहीक विकासाच्या विविध सुविधा उपलब्ध करुन देणे.
• स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन गावातील ३ कि.मी. अंतराची अट तांडा भागाकरिता शिथील.
• ज्या तांड्यांची लोकसंख्या १,००० पेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी एकापेक्षा जास्त तांडे एकत्रित करुन गट ग्रामपंचायत स्थापन करण्यास मान्यता.
• तांडा समृध्दी योजनेसाठी रु. ५०० कोटीचा निधी उपलब्ध.
• प्रती तांडा रु. ३० लक्ष निधी उपलब्ध करुन देण्यास शासनाची मान्यता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.